इतिहास – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Thu, 03 Nov 2022 04:00:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg इतिहास – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 हंट्सविल एनिमल सर्विसेज में हैलोवीन के लिए समय पर अपना नया ‘बू’ खोजें https://www.batmi.net/%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9c/ https://www.batmi.net/%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9c/#respond Mon, 31 Oct 2022 03:56:15 +0000 https://www.batmi.net/?p=27482 हंट्सविल एनिमल सर्विसेज में हैलोवीन के लिए समय पर अपना नया ‘बू’ खोजें
हंट्सविले एनिमल सर्विसेज हैलोवीन के लिए समय पर “अपना नया बू खोजने” के लिए पालतू जानवर को अपनाने के बारे में सोचने वाले किसी भी व्यक्ति को आमंत्रित करती है। आश्रय इस सप्ताह के अंत में एक प्रचार के साथ ब्लैक डॉग सिंड्रोम (बीडीएस) का मुकाबला कर रहा है जिसे हराया नहीं जा सकता। 29-31 अक्टूबर को काले या ज्यादातर काले फर वाले सभी वयस्क बिल्लियों और कुत्तों के लिए दत्तक ग्रहण शुल्क माफ कर दिया गया है। “एक काले जानवर के बारे में डरावना कुछ भी नहीं है,” निदेशक डॉ करेन शेपर्ड ने कहा। “सांख्यिकीय रूप से, वे हमारे लिए अपनाने के लिए सबसे कठिन हैं, लेकिन वे वास्तव में किसी भी अन्य जानवर की तरह मधुर, वफादार, नासमझ, चंचल या आसान हैं।”

शोध से पता चलता है कि कुछ लोग पुराने अंधविश्वासों के कारण हल्के फर वाले जानवरों को चुनते हैं, जैसे कि काली बिल्ली का दुर्भाग्य होना, या फिल्मों और टीवी शो में काले पालतू जानवरों को कैसे चित्रित किया जाता है, इससे डर लगता है। 2002 में जर्नल ऑफ एप्लाइड एनिमल वेलफेयर साइंस में प्रकाशित एक अध्ययन में, कैलिफोर्निया विश्वविद्यालय में स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिन ने कहा कि शुद्ध-काले जानवरों के लिए गोद लेने की दर बहुत कम थी। गोद लेने वाले पालतू जानवरों की विशेषता वाले पशु सेवा वेबपेज से पता चलता है कि वर्तमान में काले और ज्यादातर काले जानवर गोद लेने के लिए लगभग एक तिहाई पालतू जानवर हैं।

शेपर्ड ने कहा, “हम चाहते हैं कि लोग शनिवार को हमारे ट्रंक या ट्रीट के लिए बाहर आएं, कुछ मज़े करें और उन महान कुत्तों और बिल्लियों से मिलें जिन्हें हमने घरों से प्यार करने के लिए तैयार किया है।” हॉवेल-ओ-वीन ट्रंक या ट्रीट शनिवार, 29 अक्टूबर को सुबह 10 बजे से दोपहर तक होगा। वयस्क काले या ज्यादातर काली बिल्लियों और कुत्तों के लिए गोद लेने की फीस माफ करने के अलावा, आश्रय अन्य सभी जानवरों के लिए $ 10 की फीस कम कर देगा। हैलोवीन के माध्यम से।

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9c/feed/ 0 27482
असे होते पुरोगामी विचारांचे राजे सयाजीराव गायकवाड! https://www.batmi.net/such-was-the-king-of-progressive-thought-sayajirao-gaikwad/ https://www.batmi.net/such-was-the-king-of-progressive-thought-sayajirao-gaikwad/#respond Sat, 24 Sep 2022 08:46:27 +0000 https://www.batmi.net/?p=26386 समाज सुधारकांमध्ये कोणत्या राजा महाराजांचे नाव घेतले जात असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड. सयाजीरावांचे राज्य तसे बडोद्याचे असल्यामुळे कायम मराठी माणसाने ह्यांच्या इतिहासाकडे व कार्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आजच्या लेखामधून त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सयाजीराव तसे कुठे जन्माला आले. त्यांना महाराज कोणी बनवले? त्यांनी काय कार्य केले हे आजच्या लेखातून जाणून घेऊ.

बडोद्याला गायकवाड घराण्याचे राज्य होते. खंडेराव गायकवाड तिथले महाराज होते. त्यांची पहिली पत्नी लवकर निधन पावली. पुढे त्यांच्या दुसरी पत्नी महाराणी जमनाबाई ह्यांना मुलं झाली पण अल्पकाळातच ती दगावली.

त्या वेळेस जमनाबाई ह्यांनी आपल्या गायकवाड घराण्यातील इतर शाखांमधील लोकांना बोलावले. सोपे करून सांगायचे तर एका घराण्याच्या अनेक शाखा असतात. पुढे त्या इतक्या विभागल्या जातात की त्या आडनावाचे गाव निर्माण होते. कधी कधी एकाच आडनावाची व एकाच घरण्यातले लोक आपल्याला दिसतात त्याच ह्या शाखा असतात. तेव्हा महाराणी जमनाबाई ह्यांनी गायकवाड शाखेचा शोध घेतला.

नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यात तेव्हा कौळाणे भागात काशीराव गायकवाड ह्यांना ११ मार्च १८६३ रोजी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी गोपाळ असे ठेवले होते. काही वर्षांनी जमनाबाई ह्यांनी काशीरावांना व त्यांच्या मुलांना बोलावून घेतले.

काशीराव आपल्या आनंदराव, संपतराव आणि गोपाळराव ह्या तिन्ही मुलांसोबत कौळाणे वरून बडोद्याला पायी गेल्याचे जाणकार सांगतात. तिथे गेल्यानंतर जमनाबाईंनी तिन्ही मुलांची परीक्षा घेतली. आनंदराव, संपतराव आणि गोपाळराव रांगेत उभे होते. त्यांना जमनाबाई यांनी प्रश्न विचारला,

“तुम्ही इथे का आलात?” तेव्हा आनंदराव व संपतराव ह्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘घरच्यांचे ऐकून आम्ही इथे आलो आहोत.’ मात्र गोपाळरावांनी उत्तर दिले ते महाराणी साहेबांना अगदी आवडले. गोपाळराव म्हणाले, “मी इथे राजा होण्यासाठी आलो आहे.” हे ऐकताच जमनाबाई ह्यांनी गोपाळरावांना दत्तक घेतले आणि २७ मे १८७५ ला त्यांचे सयाजीराव असे नामकरण केले.

सयाजीरावांनी सारे प्रशिक्षण घेतले व ते गादीवर बसले. ते पुरोगामी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचे किती गुण गावेत. त्यांच्या हातून घडलेल्या कार्यामुळे भारताला एक नवीन संदेश मिळाला होता. त्यांनी सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

ह्यासाठी अत्यंत कडक कायदे बनवले व त्याची अमंलबजावणी देखील करण्यात आली. शिक्षण घेतल्यानेच माणसाचे भले होते हे त्यांना ठाऊक होते. यामुळेच हा शिक्षणाचा घाट त्यांनी घातला होता. त्यांच्या बडोद्याच्या राज्यात त्यांनी बरेच आर्थिक सुधार केले.

आज जी आपण बँक ऑफ बडोदा बघतो ती सयाजीरावांनीच २० जुलै १९०८ साली सुरू केली होती. अशा काही सुधारणांसोबत त्यांनी प्रशासकीय कामांची देखील विभागणी केली. लोक नेमले आणि उत्तम प्रशासन निर्माण केले. राज्याला व राज्यातील रयतेला आधार असतो तो न्यायाचा. म्हणूनच सयाजीरावांनी न्यायव्यवस्था सक्षम केली. ग्रामपंचायत त्यांनी पुनर्जीवित केली.

ज्यांना औद्योगिक क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असेल त्यांच्यासाठी महाराजांनी ‘कलाभुवन’ निर्माण केले. ज्यांना संस्कृत ग्रंथांमध्ये रस आहे त्यांच्यासाठी ‘प्राच्य विद्यामंदिर’ निर्माण केले. ह्यासोबतच राज्यात साक्षरता वाढावी म्हणून शाळा चालू केल्या आणि वाचन वाढावे म्हणून अनेक वाचनालये महाराजांनी चालू केली.

उन्नतीसाठी आधी समाजात सुधार व्हावा लागतो. म्हणूनच पुरोगामी विचारांच्या सयाजीरावांनी चुकीच्या गोष्टींचे खंडन केले आणि एक आदर्श समाज बनवण्याचे कार्य केले. त्यांनी बालविवाहाला विरोध केला. कन्या विक्री खरेदीवर बंदी आणली.

विधवांच्या पुनर्विवाहासाठी कार्य केले सोबतच अस्पृश्यता निवारण केले. जातिभेद संपवला. हरिजनांसाठी विशेष अशा १८ शाळा उभ्या केल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली होती व नंतर उत्तम पदावर नोकरी दिली होती. सयाजीरावांचे विचार खूप प्रगत होते. घटस्फोटाचा कायदा त्यांच्या राज्यात आधी अमलात आणला गेला.

बडोदा शहर चांगले ठिकाण बनवण्यात देखील सायजीरावांचा हात आहे. त्यांनी अनेक वस्तूसंग्रहालयांची स्थापना केली. लक्ष्मी विलास पॅलेस, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाज राजवाडा इत्यादी वास्तू त्यांनी उभारल्या. लाल झेंड्यावर मुकुट आणि तलवार असा बडोद्याचा ध्वज होता.

ह्या ध्वजाखाली सयाजीरावांनी सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित केले होते. सयाजीरावांचे मुंबई इथे ६ फेब्रुवारी १९३९ ला निधन झाले. आज देखील सयाजीरावांच्या विचारांची आणि कृतींची भारताला गरज आहे. अशा कल्याणकारी राजाला वंदन!

]]>
https://www.batmi.net/such-was-the-king-of-progressive-thought-sayajirao-gaikwad/feed/ 0 26386
असा ‘धाडसी’ होता औरंगजेबाचा निंदक ‘कवी भूषण’! https://www.batmi.net/aurangzebs-slanderer-kavi-bhushan-was-so-brave/ https://www.batmi.net/aurangzebs-slanderer-kavi-bhushan-was-so-brave/#respond Fri, 19 Aug 2022 07:51:52 +0000 https://www.batmi.net/?p=26388 काही मोजके लोक नेहमी अन्यायकारक नि चुकीच्या लोकांना, प्रथेला, विचारधारेला इत्यादी गोष्टींना समर्थन देत असतात. ह्या ना त्याप्रकारे समाजात तेढ निर्माण होते ती वेगळीच.

इतिहासात ज्या औरंगजेबाची नाचक्की, बदनामी, क्रूरता नमूद आहे तो आपला आदर्श कसा होऊ शकतो? अर्थात ह्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध वाचा फोडण्यासाठी लागते ते धाडस. जे साडेतीनशे वर्षांपूर्वी थेट औरंगजेबाच्या दरबारात एका व्यक्तीने केले होते.

एक कवी ज्याने जीवाची तमा न बाळगता धाडसाने औरंगजेबासमोर त्याच्याच अत्याचाराचे व पापाचे पाठ वाचून दाखवले. तो कवी म्हणजे कवीराज भूषण. नेमके हा भूषण औरंगजेबाला काय म्हणाला हे पाहूयात.

कवी भूषण औरंगजेबाच्या दरबारात कविता सादर करणार होता त्याने अभयदान मागून छंद गायला सुरुवात केला.

“किबले की ठोर बाप बादशाह साहंजाह,
ताको कैद कियो मानो मक्के आग लायी हे।
बडो भाई दारा को पकरीके मारी दारियो,
मेह रहू नाही माको बडो सगा भाई हे।।”

अर्थात मक्केच्या काबे इतके पवित्र असणाऱ्या वडीलांना ह्या औरंगजेबाने अटक केली. जणू मक्क्याला आग लागावी इतके मोठे ते पाप होते. ह्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद करून बादशाहपद बळकावले. शहाजहानसाठी त्याने एक खोली ठेवली होती, त्या बाहेर शहाजहानला येण्यास बंदी होती.

केवळ त्या खोलीतून ताजमहाल दिसायचा इतकेच काय ते सुख. औरंगजेबाने धूप अंगाऱ्यात विष मिसळून त्याचा उबारा स्वतःच्या बापाला दिला होता. इतकेच नाही तर स्वतःच्या सख्या भावाला ह्या क्रूर औरंग्याने मारले होते. एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन तो भावाच्या जीवावर उठला होता.

दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ हिंदू मुसलमानास समतेची वागणूक द्यायचा. त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथ फारसीमध्ये अनुवादित करत चांगले हितसंबंधही जोडले होते. पण त्यालाही औरंगजेबाने मारले. शिवाय आपल्या बापासमोर सख्ख्या काकाचा गळा दाबत त्याचा जीव घेतला ते वेगळेच. 

“बंधू तो मुरादबक्ष बादी चुक करिबे को,
बिच ले कुरान खुदा की कसम खाई हे।
भूषण सुकवी कहे सुनो नवरंग जेब,
ये तो काम किन्ने तेयु पादशाही पायी हे।।”

भूषण म्हणतो, ‘हे औरंगजेबा तुझ्या दुसऱ्या भावाला मुरादबक्ष ह्यास कुराणाची शपथ घेऊन तू दगा न देण्याचे वचन दिले होते. पण तरी छलकपट करत तू त्यासही कैद केलेस.

अश्या खोट्या शपथा घेऊन पाप करत तू हे पादशाहीचे पद मिळवले आहे.’ दरबारात सारे लोक हे ऐकून थक्क झाले होते पुढे काय होईल ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. तोच कवी भूषणाने पुढचे छंद गण्यास सुरुवात केली.

“हाथ तसबीह लिए प्रातः उठे बंदगी को
आपही कपट रूप कपट सु जप के।
आगरे में जाय दारा चौक मे चुनाय लिन्हो
छत्रहू छिनायो मानो मरे बुढे बाप के।।”

भूषण म्हणतो हा औरंगजेब सकाळी जपमाळ घेऊन अल्लाहची आराधना करतो ते सारे कपट आहे. टोप्या आणि चादरी विणून मानवतावादी कोणीही होत नसतं. हा जपमाळेत देवाचे नाही कपटाचेच जप करतो. आग्ऱ्यात दारा शिकोह ह्यास औरंग्याने चिणून मारले आपल्या बापजाद्यांचे तख्त लबाडीने बळकावले.

शेवटच्या छंदात भूषण म्हणतो,

“किन्हों है सगोत घात सो मैं नाही कहों,
फेरी पिल पै तोरायो चार चुगुल के गपके।
भूषण भनत छटछांदी मती मंद महा
सौ सौ चुहाई खायके बिलारी बैठी तप के।।”

अर्थात चारचौघांचे ऐकून ह्या औरंग्याने स्वतःच्याच लोकांना हत्तीच्या पायी दिलेले आहे. आणि हा धर्माचा आव तर असा आणतो की, असे वाटते जणू शंभर उंदीर खाऊन मांजर तपालाच बसली आहे.

इथून भूषणाने आपली सुटका करून घेतली मात्र औरंग्याला त्याची जागा आपल्या प्रतिभावान वाणीतून त्याने दाखवून दिली. काही इतिहासकार ह्या कथेला आख्यायिका मानतात पण त्यामागचा हेतू हाच की चुकीच्या गोष्टींना सुज्ञ माणसाने विरोध केलाच पाहिजे.

औरंगजेब तेव्हा पण होता आणि आजही लोकांच्या वृत्तीमध्ये आहे. केवळ कवी भूषण बनून गर्जना करायची आहे. चुकीला चूक म्हणण्यात कसलेच न्यूनगंड नसावे. ज्या काळात औरंगजेबासारखा कट्टर व्यक्ती असताना भूषणाला छंद म्हणताना भीती वाटली नाही,

आपण तर शिवरायांच्याच स्वराज्यातले व मातीतले आहोत. औरंगजेबासारख्या दुष्ट प्रवृत्तींना विरोध करत आपणही हे धाडस दाखवले पाहिजे.

कारण आपला माथा टेकतो तो केवळ शिवप्रभूंच्या समाधी पुढे. इथे मान वाकवली की आयुष्यभर ताठ मानेने जगता येते. म्हणूनच ताठ मानेने जगत चुकीच्या गोष्टींविरुद्ध वाचा फोडायची असते. बरोबर ना? या विषयी आपले मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा.

]]>
https://www.batmi.net/aurangzebs-slanderer-kavi-bhushan-was-so-brave/feed/ 0 26388
औरंगजेबाने लावलेला निर्दयी जिझिया कर हा कसा होता? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/how-was-the-brutal-jizya-tax-imposed-by-aurangzeb/ https://www.batmi.net/how-was-the-brutal-jizya-tax-imposed-by-aurangzeb/#respond Fri, 19 Aug 2022 07:50:15 +0000 https://www.batmi.net/?p=26390 सध्या देशभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे. काही मोजक्याच लोकांचे म्हणणे आहे की त्या कबरीला फुलं वाहणे काहीही चुकीचे नाहीये. मात्र बहुतांश हिंदू व मुस्लिम लोक ह्या गोष्टीच्या विरोधात आहेत.

ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला, स्वकीयांचे राज्य निर्माण केले आणि हेच राज्य बुडवू पाहणाऱ्या औरंगजेबाला कसे आपण वंदन करू शकू? औरंगजेब कसा होता हे सर्व लोकांना माहिती आहेच.

आज काही मोजक्या लोकांची इच्छा नसली तरी इतिहास औरंगजेबाला निर्दयी, क्रूर, कपटी आणि वाईट असल्याचेच सांगतो.

ह्याचेच एक मोठे उदाहरण आहे औरंगजेबाने हिंदूंवर लादलेला जिझिया कर. हा कर नेमका काय असतो, त्याचा इतिहास काय? औरंगजेबाने ह्या संबंधित काय केले व शिवरायांनी कोणती पाऊले उचलली आहे हे सारे काही आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

सर्वात आधी जिझिया कर काय होता हे पाहुयात. मुस्लिम राजवटी जसजशा जगात निर्माण होत गेल्या तसतशा काही कर्मठ मुसलमानांनी हा कर वापरात आणला. त्यांच्यानुसार मुसलमान सोडले तर सारे धर्म चुकीचे होते.

मुसलमान असणेच जगण्याचे सार आहे पण त्यासाठी ह्या काही कर्मठांनी मनाला वाटेल ते अत्याचार लोकांवर केले होते. मुसलमानेतरांना ह्या जगात जगण्याचा अधिकार नाही म्हणून केवळ दोन पर्याय दिले जायचे. एकतर धर्मांतर करावे किंवा मृत्यूस सामोरे जावे.

पण काही काळानंतर ह्या गोष्टी सांभाळणे व अंमलात आणणे कठीण गेले तेव्हा जन्म झाला जिझियाचा. हा कर केवळ हिंदूंवर नाही तर जे जे मुसलमानेतर आहे त्यांच्यावर लादला होता.

ह्यात कर घेऊन त्या उर्वरित धर्मियांना समाजामध्ये दुय्यम दर्जा दिल्या जायचा. त्यांनाच ‘जिम्मी’ असे म्हणतात. जिझिया कर केवळ पैश्यापुरता मर्यादित नसून त्यात अनेक गोष्टी होत्या.

जिझियाचे प्रारूप असे होते – मुसलमानेतरांनी धार्मिक स्थळे बांधायची नाहीत, जुने तुटलेले मंदिर पुन्हा बांधायचे नाही; मुसलमान लोक त्यांच्या यात्रेदरम्यान इतरांच्या मंदिरात राहू शकतील;

मुसलमान व्यक्ती गैरमुसलमानाच्या घरी ३ दिवस सहज म्हणून राहू शकतो; त्या तीन दिवसात त्याने केलेले काम गुन्हा मानला जाणार नाही;

मुसलमानेतरांनी कोणती सभा घेतली तर त्यात मुसलमान येऊ शकतात; इतरांनी आपल्या मुलामुलींची नावे मुसलमानांप्रमाणे ठेवायची नाहीत; इतरांनी मुसलमानांप्रमाणे कपडे घालायचे नाहीत; घोडा वापरायचा असेल तर त्याला लगाम व खोगीर लावायचे नाही;

धनुष्यबाण व तलवार चालवायची नाही; त्यांनी दारू प्यायची नाही व अंगठी देखील घालायची नाही; जुना पोशाख बदलायचा नाही; स्वतःचे सण उत्सव साजरे करायचे नाहीत;

इतकेच काय तर घरातील कोणाचे निधन झाले तर त्याचे प्रेत कब्रस्तानात आणायचे नाही; त्या व्यक्तीसाठी शोक करीत बसायचे नाही; हेरांना मदत करायची नाही व मुसलमान असणाऱ्या लोकांना स्वतःकडे नोकर म्हणून ठेवायचे नाही.

हा कर अकबराच्या काळात पण होता, त्याने तो काढून टाकला होता. त्याने तो कर हिंदूंच्या भावनेचा आदर करत काढला की बहुसंख्यांकांच्या दबावात काढला हा अभ्यासाचा विषय आहे. अकबराच्या दरबारात तसे अनेक लोक हिंदू होते.

त्यामुळे कदाचित अडचण आली असणार. शिवाय अकबर हिंदू मुसलमान असे भेद करत नव्हता असे काही जाणकार सांगतात. हा कदाचित त्याच गोष्टीचा परिणाम असू शकतो.

मात्र त्याचा पणतू औरंगजेब ह्याने हा कर पुनर्जीवित केला होता. ह्याच्या डोक्यात धर्मांधतेचे खुळ होतेच मुळी. तो स्वतःला आलमगीर म्हणवून घ्यायचा म्हणजेच आलम (संपूर्ण) दुनियचे राजा.

त्यात ‘आलमगीर जिंदा पिर’ अशी त्याची घोषणा सारे पगारी नोकर त्याच्या आनंदासाठी देत असायचे. ह्याने २ एप्रिल १६७९ ला हा कर लावण्यास सुरुवात केली होती. आचार्य गोपालदास ह्यांनी कर भरण्यास नकार दिल्याने त्यांना भर दरबारात ह्या औरंगजेबाने मारले होते.

शिवरायांना हे समजताच त्यांनी औरंगजेबास पत्र धाडले. काही इतिहासकार हे पत्र मानत नाहीत. मात्र त्यात शिवराय स्पष्टपणे औरंगजेबाला खडे बोल सुनावतात. तुम्ही हिंदूंवर कर लावला ह्याचा अर्थ तुमचा खजिना रिकामा झाला का?

असे म्हणत महाराजांनी औरंगजेबाला अकबराचे उदाहरण दिले. शिवाय एकाच देवाची आपण सारी लेकरे आहोत. कोणी बांग देतो तर कोणी घंटानाद करतो. ह्यांच्यात भेद केला तर त्या ईश्वराच्या निर्मितीवर डाग लावण्यासारखे आहे. असे ह्या पत्रात महाराजांनी म्हटले आहे.

पुढे मात्र हा कर औरंगजेबाच्या नातवाने जहाँदर शाह याने बंद केला. तसा ही ह्या कराचा फटका स्वराज्याला बसलाच नव्हता. त्यामुळे तो चालू असून बंद असल्यासारखाच होता.

मात्र ह्यातून औरंगजेबाच्या विकृतीचे दर्शन घडते. ह्याने केवळ हिंदूंना नाही तर मुसलमानांना देखील त्रास दिला होता. चक्क मुसलमानांच्या दाढीची लांबी मोजण्याकरिता ह्या औरंगजेबाने पगारी लोक ठेवले होते.

औरंगजेबाच्या कबरी पुढे डोकं टेकवणाऱ्यांवर त्या काळात अन्याय झाला असता तर कदाचित औरंगजेबाची कबर बांधायची माणुसकी सुद्धा कोणी दाखवली नसती.

पण आजच्या लोकांना औरंगजेब कसा होता हे माहित असून सुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतात. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. आपलं यावर काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

]]>
https://www.batmi.net/how-was-the-brutal-jizya-tax-imposed-by-aurangzeb/feed/ 0 26390
भक्तीचा खरा अर्थ सांगणारे संत चोखोबा… https://www.batmi.net/saint-chokhoba-who-tells-the-true-meaning-of-devotion/ https://www.batmi.net/saint-chokhoba-who-tells-the-true-meaning-of-devotion/#respond Fri, 19 Aug 2022 07:48:25 +0000 https://www.batmi.net/?p=26392 भाव शिरोमणी संत चोखामेळा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे संत आहेत. जातीने महार म्हणून त्यांना उच्चवर्णीय लोकांनी खूप त्रास दिल्याचे आपण जाणतोच. पण एका शब्दानेही विठ्ठलाला त्यांनी बोल लावले नाही.

सर्व महार जातीतील लोकांनी गावाबाहेर राहावे म्हणून एक भिंत बांधण्यात आली होती, त्याच भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते. स्वतः नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी पंढरपूरात आणल्या व जिथे चोखोबा उभे राहायचे तिथे समाधी बांधली.

त्यांच्या भोळ्या भक्तीचे फळ हेच की, आजही पांडुरंगाचे दर्शन घेण्याआधी चोखोबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागते. आज चोखोबांची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने त्यांच्या एका अभंगातून अध्यात्माचे मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

ह्या अभंगातून चोखोबा सांगतात की, मला काहीही ज्ञान वगैरे कळत नाही. माझ्याकडे केवळ भोळा भाव आहे त्यानेच माझा भगवंत प्रसन्न होतो. ते म्हणतात “आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण। वेदाचें वचन नकळे आम्हां।।” चोखोबांना त्यांच्या जातीमुळे उच्चवर्णीय लोकांनी ज्ञानापासून वंचित ठेवले.

त्यांचे मन ह्या गोष्टींमुळे पिळवटून निघाले असेल. कारण चोखोबा म्हणतात, “उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन।।” असे शब्द ऐकून आपल्यालाच वाटते की, त्या काळात जाऊन चोखोबांचा हात हातात घ्यावा आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीला लावावा.

जी काय शिक्षा व्हायची, ती थोडी आपण सहन करू. पण चोखोबांचाच अधिकार इतका मोठा आहे की त्यांनी आपला हात धरून अध्यात्म समजावले आहे.

चंद्रभागा नदीकडे आपल्याला घेऊन जावे नि सांगावे “चोखा म्हणे मज नवल वाटावे। विठ्ठलपरते आहे कोण।।”

अर्थात चोखोबा सांगतात की, देव मंदिरातच आहे असे नाही, तो तर ह्या चंद्रभागेच्या वाळवंटात आणि जगाच्या कणाकणात आहे. असं काय आहे, जे विठ्ठल नाहीये? इतके ज्ञान असून देखील चोखोबा म्हणतात की, आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी कळत नाही.

पुराणातील कथा मर्म आम्हाला कळत नाही. आणि इतकेच नाही तर वेदांमधील जी वचने आहेत ती देखील आम्हाला कळत नाही. आता चोखोबा असे म्हणत असले तरी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की, जे ज्ञान वेदांना कळणार नाही ते वारकरी संतांकडे होते.

जरी वाचनाचा अधिकार चोखोबांना नव्हता तरी देखील नामदेवांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले होते. नामदेवांनी त्यांना अध्यात्माचे मर्म सांगितले म्हणूनच चोखोबांना वेदांचे ज्ञान ठाऊक नसल्याची खंत वाटत नाही. चोखोबा पुढे म्हणतात,

“आगमाची आढी निगमाचा भेद। शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां।।”

आगम हे अध्यात्मातील एक तत्वज्ञान आहे. ते शैव परंपरेत असते. तसेच निगम म्हणजे वेदप्रमाण मानणारे वैष्णव होय. इथे चोखोबा म्हणतात की, आम्हाला ह्या शिव परंपरेतील आगमाची आढी व विष्णू परंपरेतील निगमाचा हा भेद माहिती नाहीये.

पुढे ते म्हणतात, शास्त्रांचा संवाद देखील आम्हाला कळत नाही. सुरुवातीला वेदांचे वचन व नंतर शास्त्रांचा संवाद असे चोखोबांनी म्हटले आहे, ह्याचे कारण असे की, वेदांमध्ये नियम किंवा सूत्र असतात ज्याला आपण वचन म्हणतो तसेच शास्त्रांमध्ये ऋषीमुनींचे संवाद आहेत. ते एक ज्ञानाचे मंथन आहे पण हे देखील आम्हाला कळत नाही असे चोखोबा म्हणतात.

अभंगाच्या तिसऱ्या चरणात चोखोबा म्हणतात, “योग याग तप अष्टांग साधन। नकळेची दान व्रत तप।।” अर्थात आम्हाला योग विद्या माहिती नाहीये, आम्हाला यागयज्ञ कळत नाही, तप करणे आम्हाला जमत नाही तसेच मोक्षप्राप्तीसाठी लागणारी आठ प्रकारची योगसाधने देखील आम्हाला ठाऊक नाहीयेत.

दान देणे वा व्रत उपवास करणे देखील आम्हाला कळत नाही. आता काहीच कळत नाही ,असे चोखोबा म्हणतात खरे पण त्यांना जे येते ते कदाचित कोणालाच येत नसावे. पंडितांना देखील माहिती नसेल इतकी माहिती वरील तीन चरणांमध्ये देत चोखोबा स्वतःला अज्ञानी का म्हणतात हा प्रश्न महत्वाचा आहे. ह्याचे उत्तर शेवटच्या चरणात देताना ते म्हणतात,

“चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझें।।” ह्यात चोखोबांच्या अभंगाचा मर्म समजतो. आम्हाला हे ज्ञान कळत नाही आणि कळण्याची गरज देखील नाहीये. एक भोळा भाव असला की, देव आपलाच होतो. देव भावाचा भुकेला असतो.

अर्थात देवाला केवळ भाव समजतो. जाती-धर्म तर मानवाने निर्माण केले. चोखोबांच्याच शब्दात सांगायचे तर ते म्हणतात, “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा।।” म्हणजे तुमच्या लेखी माझी जात आणि मी हीन असेन पण माझा भाव शुद्ध आहे हेच चोखोबा सांगतात.

अर्थात ही केवळ स्वतःची भावना नसून चोखोबा आपल्याला अध्यात्माचे सार सांगतात. ‘इतके ज्ञान मिळवत बसू नका. कारण केवळ एक शुद्ध भाव तुम्हाला देवस्वरूप बनवेल’, असे म्हणत चोखोबा आपल्या सारख्या अज्ञानी लोकांसमोर ज्ञानाची कवाडे खुली करतात.

]]>
https://www.batmi.net/saint-chokhoba-who-tells-the-true-meaning-of-devotion/feed/ 0 26392
प्रत्येक भारतीयाच्या मनात खदखदणारी फाळणीची घोषणा! https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/ https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/#respond Fri, 19 Aug 2022 07:45:54 +0000 https://www.batmi.net/?p=26378 भारताची फाळणी झाली म्हणून आपल्याकडे १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस मानतात. पण या दिवसाची बीजे ज्या दिवशी रोवली गेली तो दिवस होता, ३ जून १९४७. याच दिवशी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही फाळणीची घोषणा केली.

पण या फाळणीच्या घोषणेनंतर काय झालं? याबद्दल थोडी खोलात जाऊन माहिती घेऊया. लेख पूर्ण वाचलात तर आपल्या देशाचा एक संघर्षमय इतिहास तुम्हाला समजेल.

भारताची फाळणी कशी झाली?

दुसऱ्या महायुद्धाच्या विरामानंतर इंग्लंडमध्ये ‘क्लेमेंट ऍटली’ हे ब्रिटिश पंतप्रधानपदी बसले. इंग्लंडकडून भारताकडे सत्ता देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ‘माउंटबॅटन’ यांची भारतात व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती केली.

त्यांनी एक योजना मांडली, ज्यात भारतातील तत्कालीन राज्ये स्वतंत्र ठेवून वेगवेगळी ठेवायची आणि त्यांना ‘संविधान सभेत’ सामील व्हायचे की नाही, हे निवडण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव मांडला, त्याला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला तेव्हा माउंटबॅटननी ती योजना रद्द केली.

त्यांच्या या योजनेला ‘डिकी बर्ड योजना’ किंवा ‘भारताचे बाल्कनीकरण योजना’ असं म्हणतात. पुढे त्यांनी ३ जूनची योजना आणली.

३ जूनच्या योजनेत घोषित करण्यात आले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन राष्ट्रांमध्ये विभागला जाईल – भारत आणि पाकिस्तान. १५ ऑगस्ट १९४७ रोजी विभाजन लागू झाले.

याच योजनेत फाळणीच्या तत्त्वांचा समावेश होता आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वायत्तता आणि सार्वभौमत्व दिले गेले.

तसेच राष्ट्रांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याचा अधिकार दिला गेला. डिकी बर्ड योजनेपेक्षा वेगळी असणारी ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी स्वीकारली.

१९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा, जो ब्रिटिश संसदेत मंजूर झाला आणि १८ जुलै १९४७ रोजी त्यास शाही संमती प्राप्त झाली, तो माउंटबॅटन योजनेच्या आधारे तयार करण्यात आला.

या योजनेनुसार, ब्रिटीश सम्राट यापुढे ‘भारताचा सम्राट’ ही पदवी वापरणार नाही आणि ब्रिटीश पार्लमेंट दोन राष्ट्रांपैकी एकावर बंधनकारक असेल असा कोणताही कायदा करू शकत नाही.

नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत गव्हर्नर-जनरलला म्हणजे माउंटबॅटनना घटनात्मक प्रमुख म्हणजे राष्ट्रपतींप्रमाणे बनवण्यात आले. या योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रांच्या संविधान सभांनी संमत केलेल्या कायद्यांना मान्यता देण्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात आले.

फाळणीनंतर काय झाला परिणाम?

फाळणीमुळे दंगली, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि स्थलांतराची प्रचंड लाट निर्माण झाली. मुस्लिम पाकिस्तानच्या दिशेने आणि हिंदू आणि शीख भारताच्या दिशेने असे लाखो लोक त्यांना सुरक्षिततेतची अपेक्षा असलेल्या ठिकाणी गेले. पायी, बैलगाडीत आणि रेल्वेने प्रवास करत करत अंदाजे १ कोटी ६० लाख लोक विस्थापित झाले.

फाळणीनंतर मृतांची संख्या २० लाखांपर्यंत गेली होती. अनेक जण दोन धर्मियांच्या हत्याकांडात मेले तर काही जणांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनी निर्वासित शिबिरांमध्ये पसरलेल्या संसर्गजन्य रोगांच्या साथीत मरण्यासाठी सोडून दिले. लाखो महिलांचे बलात्कार किंवा अपहरण करून त्यांचे हालहाल केले गेले.

फाळणीचा आणखी एक अनपेक्षित परिणाम असा झाला की, पाकिस्तानची लोकसंख्या मूळच्या अपेक्षेपेक्षा धार्मिकदृष्ट्या एकसंध झाली.

मुस्लिम लीगच्या नेत्यांनी असे गृहीत धरले होते की, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गैर-मुस्लिम लोकसंख्या असेल, ज्यांच्या उपस्थितीमुळे भारतात राहिलेल्या मुस्लिमांचे स्थान सुरक्षित होईल.

परंतु पश्चिम पाकिस्तानमध्ये, १९५१ साली बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हे एकूण लोकसंख्येच्या केवळ १.६% होते. तर पूर्व पाकिस्तान आताच्या बांगलादेशमध्ये २२% होते.

त्यानंतर दोन्ही देशांना फाळणीनंतर आलेल्या निर्वासितांना सामावून घेण्यात आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.

१९४७-४८ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विवादित प्रदेशाबाबत दोन राज्यांमध्ये युद्ध झाल्यानंतर निर्वासितांची संख्या अजूनच वाढली.

६० च्या दशकाच्या उत्तरार्धातही स्थलांतरित झालेल्या लोकांच्या झुंडी भारतात येतच होत्या. जातीय तणावाच्या नंतरच्या संघर्षांनी आणखी चळवळ निर्माण केली.

फाळणीमुळे भारत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला न जाता एकसंध राहिला हे जरी खरं असलं तरी फाळणी ही भारताच्या इतिहासातली कायमची भळभळती जखम बनून राहणार आहे.

]]>
https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/feed/ 0 26378
एसआयपी मध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/how-to-invest-properly-in-sip/ https://www.batmi.net/how-to-invest-properly-in-sip/#respond Fri, 19 Aug 2022 07:43:50 +0000 https://www.batmi.net/?p=26375 योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे ही खरंतर आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यासाठी एसआयपी हा एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा प्रकार मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन पर्याय असतात.

एक म्हणजे लमसम म्हणजेच ‘एक रकमी गुंतवणूक’ आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘एसआयपी द्वारे गुंतवणूक.’ आजच्या या लेखात आपण एसआयपी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ.

• एसआयपी म्हणजे काय ?

एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना असून ही कोणतीही स्कीम नाही. हे गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते.

उदाहरणार्थ आपल्याकडे १२,००० रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच १२,००० जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना.

तसे पाहायला गेले तर ही अगदीच साधी, सोपी आणि सरळ योजनपद्धती आहे. ज्याची प्रक्रिया योग्यरित्या जाणून घेऊन गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा आयुष्यभरासाठी होऊ शकतो.

• एसआयपी मध्ये किती रक्कम गुंतवू शकतो ?

यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये ५०० रुपयांपासून देखील एसआयपी चालू करता येऊ शकते.

काही फंड तर ५०० पेक्षा सुद्धा कमी गुंतवणूक करण्याची मुभा देतात. मुख्य म्हणजे इथे अमुक एक रक्कम भरायचीच असे बंधन नसते. त्यामुळे इथे जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो.

• एसआयपीचा कालावधी किती असतो ?

गुंतवणूकदाराला आपली एसआयपी एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी, पाच किंवा दहा वर्षांसाठी किंवा जोपर्यंत तो स्वतः एसआयपी बंद करत नाही तोपर्यंत एसआयपी चालू ठेवता येते.

• एसआयपीचे फायदे काय आहेत ?

१. अधिक परतावा (Good return on investment)

म्युच्युअल फंडच्या एसआयपी प्लॅनमध्ये काही काळानंतरच आपल्याला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येते.

परंतु जर दीर्घ कालावधीसाठी एसआयपी केली गेली तर मात्र अधिक परतावा मिळालेला दिसून येतो. किमान पाच वर्षांपेक्षा अधिक एसआयपी केली तर चांगला फायदा मिळतो.

२. एसआयपी मधील लवचिकता (Flexibility in SIP)

गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढून घेऊ शकतो. तसेच गुंतवणूकदार आपला एसआयपी प्लॅन हवा असेल तेव्हा थांबवू शकतो. एसआयपी मधील पैसे काढून घेऊ शकतो किंवा अजून नवीन पैशांची गुंतवणूक करू शकतो.

३. कमी प्रमाणातील जोखीम (Low risk SIP)

जर गुंतवणूकदार इक्विटी फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असेल तर तिथे एकाच बाजारभाव चक्रात गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जात नाहीत.

तसेच दीर्घकालीन एसआयपी मध्ये वेगवेगळ्या किमतींवर युनिट्स खरेदी केले जातात. शेवटी बाजार भावाची सरासरी काढली जाते ज्याचा जास्त नकारात्मक प्रभाव पडताना दिसून येत नाही. (फारसा तोटा होत नाही)

४. किमान रकमेतील गुंतवणूक (minimum investment in SIP)

अगदी कमीत कमी रकमेत देखील आपण आपल्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. विद्यार्थी असो, गृहिणी असो किंवा एखादा उद्योगपती असो सगळ्यांसाठी हा उत्तम मार्ग आहे.

ही होती अत्यंत आवश्यक आणि गरजेची असणारी एसआयपी संबधित माहिती. जर तुम्हालाही यात गुंतवणूक करायची असेल तर

आपण जवळच्या कोणत्याही Mutual Fund Broker किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा एसआयपी चालू करू शकता. मात्र, सगळी माहिती, कागदपत्रे पाहूनच गुंतवणूक करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा.

]]>
https://www.batmi.net/how-to-invest-properly-in-sip/feed/ 0 26375
आनंदी जीवनाचं तंत्र सोप्प्या भाषेत शिकवणारं पुस्तक… https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/ https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/#respond Fri, 19 Aug 2022 07:42:13 +0000 https://www.batmi.net/?p=26363 द करेज टू बी डिसलाइक्ड हे एक जपानी पुस्तक आहे. जपानमध्ये आणि इतर देशांमध्येही हे पुस्तक प्रचंड प्रमाणात विकलं गेलं. हे केवळ पुस्तक नसून १९व्या शतकातील मानसशास्त्रज्ञ ‘आल्फ्रेड ॲडलर’ यांनी केलेल्या कामाच्या विश्लेषणावर आधारित जपानी तत्त्वज्ञान आहे.

आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या हातात असून इतर कशावरही अवलंबून नाही हा संदेश आपल्याला या पुस्तकातून मिळतो. ‘इचिरो किशिमी’ आणि ‘फुमिटेक कोगा’ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

वेगवेगळी प्रकरणं, मुद्द्यांमधून पुस्तक उलगडत जातं हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. पण हे पुस्तक मात्र प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं. एक तरुण व्यक्ती प्रश्न विचारते आणि मानसशास्त्रज्ञ ॲडलर आपल्या तत्वज्ञानातून मार्गदर्शन करतात.

यामध्ये आयुष्यातले क्लिष्ट प्रश्न, समस्या, प्रसंग अशा प्रत्येक प्रकारचे प्रश्न ती व्यक्ती त्यांना विचारते. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक बाजूवर आपल्याला या पुस्तकातून माहिती मिळते. म्हणूनच हे पुस्तक आपल्या स्वतःशी जोडलं जातं. यातले प्रश्न आणि उत्तरं आपल्याशीच संबंधित वाटतात.

आपल्याला वाटतं की, आपल्या भावना आपल्या नियंत्रणात नाहीत, राग आल्यावर आपला कंट्रोल जातो. कधी आपण एखाद्यावर जोरात ओरडून राग व्यक्त करतो तर कधी एखादी वस्तूदेखील फोडतो आणि आपल्या या कृतीचं खापर आपण भावनांवर फोडतो.

मला राग आला म्हणून मी तसं वागलो असं म्हणून मोकळं होतो. ही पळवाट अतिशय चुकीची आहे, याची जाणीव आपल्याला या पुस्तकातून होते. आपल्या प्रत्येकात स्वतःला नियंत्रित ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आपण आपल्या भावनांना निवडू शकतो, नियंत्रणात करु शकतो, ही शिकवण उदाहरणांमधून आपल्याला मिळते.

त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या समस्यांच्या मुळावरही हे पुस्तक भाष्य करतं. आयुष्यातल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या परस्पर संबंधांमध्ये असल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. प्रत्येक माणूस नात्यांतून बनला आहे.

आपलं इतरांशी नातं कसं आहे, आपलं स्वतःशी नातं कसं आहे, याभोवती आयुष्य फिरत असतं. आपण स्वतःला कमी समजत असू तर अनेक समस्या आपण स्वतःहूनच निर्माण करतो. याबरोबरच सतत लोकं काय म्हणतील, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकू का, यातूनही अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपण स्वतःला प्रेमाने वागवण्याची गरज असते.

जर आपणच स्वतःला प्रेमाने, सन्मानाने वागवलं नाही तर इतरांकडूनही आपल्याला तशी वागणूक मिळत नाही आणि हे पुस्तक आपल्याला हेच सगळं समजावण्याचं प्रयत्न करतं. यासाठी लोकांचा विचार सोडून देणं, कोणी आपल्याबद्दल काय बोलतं, कोण काय विचार करतं याकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे.

जेव्हा आपल्याला हे जमेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त, ताकदवान होऊन जगू शकतो. कोणताही संबंध आपल्या मनाची शांतता, स्वास्थ्य बिघडवणार नाही, याची काळजी आपण घेऊ तेव्हाच आयुष्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हा दृष्टीकोन आपल्यात आणून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हे एक पुस्तक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आजच्या गुंतागुंतीच्या डिजिटल जगात सोशल मीडिया लाइक्सच्या मागे अनेकजण पळत आहेत. प्रत्येकाला इतरांकडून ‘लाइक’ मिळण्याची अपेक्षा आहे. ते लाइक मिळाले नाही तरी अनेकजण अस्वस्थ होतात.

ही अस्वस्थता मिटवण्यासाठी इतरांकडून नापसंत केलं गेलं तरी ते स्वीकारण्याचं धैर्य आपल्यात असलं पाहिजे. कोणत्याही लाईक्सची गरज न पडता आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारण्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. ही जबाबदारी आनंदी आयुष्याच्या गोल्डन रुल्सपैकी एक आहे, असं लेखक सांगतात.

आपल्या वैयक्तिक विकासासाठी आत्मविश्वास, आदर्श, आपली मूल्य यांना चिकटून राहणं कसं गरजेचं आहे यावरदेखील लेखक आपल्याला उत्तर देतात. स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी कधीही खोटेपणा करु नका,

इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचे आदर्श पणाला लावू नका, मूल्य विसरु नका, कारण कितीही प्रयत्न केले तरी कोणाला ना कोणाला आपण नापसंतच असणार आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे वागून जे आपल्यासोबत राहतील त्यांना खरा मान द्यावा.

कधीही कोणाला व्यवस्थित ओळखल्याशिवाय विश्वास ठेवू नका. लोकांमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुमच्या मनाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून प्रयत्न करत रहा, असा मोलाचा सल्ला या पुस्तकातून आपल्याला मिळतो.

पुस्तक वाचताना अनेकदा आपणही विचारमग्न होतो, स्वतःच्या वर्तणुकीविषयी, आयुष्याविषयी प्रश्न मनात निर्माण होतात. त्यामुळे खूप शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते.

प्रश्नोत्तरांमुळे वाचन सहजसोपं होतं. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावं. वेगवेगळ्या भाषांमध्ये याचे अनुवाद उपलब्ध असून, ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने आपण हे पुस्तक विकत घेऊ शकतो.

]]>
https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/feed/ 0 26363
क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे काय आहेत? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/ https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/#respond Fri, 19 Aug 2022 07:41:18 +0000 https://www.batmi.net/?p=26354 क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी अनेकांना अडचणी असतात. कोणाला ते का आणि कशासाठी वापरावे किंवा त्याचे नेमके फायदे काय याची अजिबातच कल्पना नसते.

मग ते वापरावे किंवा नाही, त्यामुळे काही नुकसान झालं तर या संभ्रमात अनेकजण असतात. तर आजच्या या लेखात आपण क्रेडिट कार्डचे नक्की काय फायदे असतात हे जाणून घेऊयात.

• क्रेडिट कार्ड का वापरावे ?

क्रेडिट कार्ड हे एक सोयीचे साधन आहे ज्याद्वारे तुम्ही वस्तू आणि सेवांसाठी पैसे देऊ शकता. शिवाय, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन क्रेडिट कार्ड वापरू शकता.

रोख किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्हाला मिळणाऱ्या मुख्य क्रेडिट कार्डच्या फायद्यांपैकी एक म्हणजे तुम्हाला मोफत क्रेडिटचा कालावधी मिळतो. त्यामुळे तुम्ही साठवलेले पैसे न वापरतासुध्दा बरीच उत्पादने घेऊ शकता.

म्हणून, तुमच्यासाठी योग्य असलेले कार्ड निवडण्यापूर्वी कोणत्याही क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये जाणून घेणे चांगले असते.

• क्रेडिट कार्डचे फायदे

१. ईएमआय पेमेंट्स –

ईएमआय म्हणजे थोडक्यात असं कर्ज जे प्रत्येक महिन्यात ठराविक रकमेतून फेडावे लागते. क्रेडिट कार्डचा एक वेगळा फायदा म्हणजे परवडणाऱ्या ईएमआयवर फ्लॅगशिप वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले जाऊ शकते. तुम्ही निवडाल त्या कालावधीत याची परतफेड केली जाऊ शकते.

२. सोप्पी प्रक्रिया –

क्रेडिट कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे. शिवाय, पात्रता निकष पूर्ण करणे सोपे आहे आणि यासाठी मूलभूत कागदपत्रांची पूर्तता करणे देखील सोपे आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमात क्रेडिट कार्ड वापरता येत असल्याने कसली पंचाईत होत नाही. तसेच ते हाताळणे देखील सहजशक्य आहे.

३. अडचणीच्या काळात कर्ज –

आपत्कालीन खर्चाच्या बाबतीत वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधांचा वापर केला जाऊ शकतो.

यावेळी तुमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड पाहून आणि एकूणच तुमच्या मालमत्तेचा आढावा घेऊन अशी सुविधा क्रेडिट कार्डमुळे शक्य होते.

४. रोख पैसे काढणे –

डेबिट कार्डापेक्षा क्रेडिट कार्डचा आणखी एक फायदा म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे बिल सेटल करावे लागेल तेव्हा तुम्ही एटीएममधून आगाऊ रक्कम काढू शकता.

५. सवलत/ऑफर/पुरस्कार –

स्पष्टपणे, सर्वोत्कृष्ट क्रेडिट कार्ड लाभ म्हणजे सवलत आणि ऑफर ज्या तुम्ही उत्पादनांच्या श्रेणीवर घेऊ शकता.

याशिवाय, तुमचा खर्च आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे क्रेडिट कार्ड वापरता याच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. हे नंतर अधिक सवलतींसाठी रिडीम केले जाऊ शकतात.

६. पेमेंट सुरक्षा –

क्रेडिट कार्ड हे एक डिजिटल साधन आहे जे तुम्हाला पेमेंटमध्ये सुरक्षितता देते. ज्यामध्ये मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि इन-हँड सुरक्षा वैशिष्ट्यांची पूर्तता केली गेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण उरत नाही.

७. क्रेडिटवर बिग-तिकीट उत्पादने –

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने उच्च श्रेणीची म्हणजेच महागाची उत्पादने खरेदी करू शकता. केवळ क्रेडिट-मुक्त कालावधीसहच नाही तर EMI मध्ये उत्पादने खरेदी केली जाण्याची त्यात सोय आहे. त्यामुळे बजेटवर देखील याचा जास्त मोठा परिणाम होत नाही आणि तुम्ही चिंतामुक्त राहता.

८. रोख रकमेपासून मुक्ती –

तुम्ही खरेदी करता तेव्हा क्रेडिट कार्ड तुमच्यासोबत रोख रक्कम घेऊन जाण्याची गरज दूर करते. हे ऑनलाइन खरेदीची सुविधा देखील देते.

त्यामुळे कधी पैसे राहिले, विसरले तर क्रेडिट कार्ड ही चिंता मिटवू शकते. शिवाय रोख रक्कम बाहेर घेऊन फिरणे तसे धोक्याचे असते. त्यामुळे क्रेडिट कार्ड हा निश्चिंत राहण्यासाठीचा योग्य पर्याय आहे.

तर हा होता क्रेडिट कार्डचे महत्व आणि त्याचे फायदे सांगणारा लेख. या लेखातून तुम्हाला नक्कीच क्रेडिट कार्डचे फायदे लक्षात आलेच असतील.

तेव्हा क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी जागृत व्हा. स्वतःचा फायदा करून घ्या आणि हा लेख कसा वाटला तेही जरूर कळवा.

]]>
https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/feed/ 0 26354
मंकीपॉक्स आजाराबद्दल ‘ह्या’ गोष्टी माहिती आहेत का? https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/ https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/#respond Thu, 18 Aug 2022 05:56:14 +0000 https://www.batmi.net/?p=26352 आपण कांजण्या म्हणजेच चिकनपॉक्स बद्दल ऐकलं असेलच. पण मंकीपॉक्स बद्दल ऐकलं आहे का? जगात कोरोनाच्या तडाख्यातून देश अजून सावरलेले नाहीत तोवर हा अजून एक आजार येऊन धडकला आहे. तर या लेखात या आजाराबद्दल व त्याच्या विषाणूबद्दल जाणून घेऊयात.

  • मंकीपॉक्सची लागण जोरदार:

मंकीपॉक्स या दुर्मिळ संसर्गाच्या येण्याने अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. सुदैवाने , आतापर्यंत भारतात संसर्गाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, परंतु मंकीपॉक्सचा युरोपीय देश ब्रिटन,

इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेसह वीस देशांमध्ये जोरदार फैलाव होताना दिसत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही खबरदारीचा इशारा दिला आहे आणि ही सुद्धा महामारी होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे.

  • मंकीपॉक्स हे नाव का पडले:

मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्स म्हणजेच गोवरासारखाच दुर्मिळ विषाणूजन्य सांसर्गिक आजार आहे. संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो प्रथम आढळून आला तो १९५८ मध्ये. त्यावरून त्याचे मंकीपॉक्स असे नाव ठेवले गेले.

तर मंकीपॉक्सचा मानवांना संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण १९७० मध्ये नोंदवले गेले. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनाच्या प्रदेशात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्येही पसरतो.

  • मंकीपॉक्स बद्दल तज्ज्ञ काय म्हणतात:

मंकीपॉक्स हा ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा एक दुर्मिळ रोग आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग प्राण्यांपासून मानावाला व एका मानवापासून दुसऱ्याला होतो. मंकीपॉक्स विषाणू छोट्या जखमा,श्वसनमार्गातून किंवा डोळे,तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो.

प्राण्यांनी चावल्यामुळे अथवा बोचकारल्यामुळे, जंगली प्राण्यांचं मांस खाल्ल्याने या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाप्रमाणेच याचे संक्रमण शिंकल्यानंतर तयार होणाऱ्या ड्रॉप्लेट्स मुळे होऊ शकते.

रोगी व्यक्तीच्या शरीरातील घाम, थुंकी किंवा जखमांशी थेट व अप्रत्यक्षरित्या संपर्क आला की या आजाराचे मानवास संक्रमण होऊ शकते.

हा विषाणू ‘पॉक्सविरिडे’ या विषाणू कुटुंबातील आहे. या कुटुंबामध्ये कांजिण्या आणि गोवर या रोगांना कारणीभूत असलेले विषाणू देखील समाविष्ट आहेत.

  • मंकीपॉक्स या आजाराची काय आहेत लक्षणे:

मंकीपॉक्स विषाणू मानवी शरीतात गेल्यांनंतर या रोगाची लक्षणे स्पष्टपणे दिसण्याचा कालावधी साधारणतः एक ते दोन आठवड्यांचा असतो.

परंतु काही प्रसंगी तो ५ – २० दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सहसा संसर्ग होत नाही. ताप येणे,पुरळ उठणे आणि जास्त संख्येने गाठी तयार होणे ही

मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. काही वेळेस गुंतागुंतीची वैद्यकीय परिस्थिती होऊ शकते. हे पुरळ शक्यतो चेहऱ्यावर आणि हातपायांवर उठतात.

चेहरा, हाताचे तळवे आणि पायांचे तळवे जास्त प्रमाणात व त्यानंतर तोंडात , जननेंद्रियाच्या ठिकाणी आणि डोळ्यातही पुरळ येतात. याची लक्षणे २-४ आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. मृत्यू होण्याचं प्रमाण साधारणतः १-१०% इतकं आहे. लहान मुलांमध्ये या लक्षणांची तीव्रता अधिक आहे.

पुरळ उठणे सुरू होण्याच्या दोनेक दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग पसरवू शकतो आणि सगळ्या पुरळांवरील खपली पडेपर्यंत संक्रमण राहू शकते.

  • मंकीपॉक्सवर कसा उपचार केला जातो?

मंकीपॉक्स या रोगावर अजूनही कोणतेच ठराविक औषध नाही. म्हणूनच आधीपासून असलेल्या अँटीव्हायरल औषधांच्या द्वारे याचा उपचार करण्यात येतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर भर देण्यात येतो. वर सांगितल्याप्रमाणे याचे विषाणू कांजण्याच्या विषाणूंच्या वर्गात मोडतात म्हणून कांजण्यांचे औषध देऊनच याचा उपचार केला जातो.

‘टेकोविरिमेट’ हेच उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. ते खरंतर सर्वत्र मिळत नाही. म्हणून जिकडे जी अँटीव्हायरल औषधे आहे ती दिली जातात.

आपल्याकडे याचे रुग्ण नसतील ही चांगली बाब आहे पण आपण सतर्क राहायलाच हवं आहे. तुम्हालाही हेच वाटतं ना?
]]>
https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/feed/ 0 26352